परवा हे रात्री बोलून गेले
कधी नव्हे ते गोड-गोड हसत,
“आपल्याला सून हवी तुझ्यासारखी–
अगदी समजूतदार, शांत ! “
बोलून ते झोपून गेले,
अन घोरायलाही लागले.
मी आपली गप्प, त्यांच्याकडे बघत
आतला आनंद सरावानं लपवत..
‘उशीरा का होईना.. !’ म्हणत,
नकळत होते स्वतःशीच हुरळत.
पण…बराच वेळ जागल्यावर
आले सवयीनं भानावर
विचार केला बोलण्यावर
म्हटलं घ्यावं का ते मनावर ?
खरंच का ह्यांना आवडलंय,
आपलं आजवरचं वागणं
का ह्यांना अजून एक हवंय
बिनआवाजाचं खेळणं ?
मुलगा आपल्या दोघांचा,
आहे म्हणायला मातृमुखी
बाकी वळणावर त्यांच्या,
सारी लक्षणं सारखी..
बाप-लेकांचे शब्द झेलणं
झालंय मला नेहेमीचं,
काम नाहिये पण हे
नवख्या पोरी-सोरीचं.
दुसर्याची लेक, आशेनं
आपल्याघरी येईल
माझं झालं ते झालं,
पण तिचं काय होईल ?
28 01 2008 at 3:01 pm |
verry good
29 01 2008 at 2:02 pm |
kharch sasubainchi chinta rastch aahe,tynche zale te zale,navya suneche kashe nibhnar.khup chan,eka stri[women] chya manatla lihile aahe.
29 01 2008 at 9:40 pm |
घरोघरी त्याच परी
19 02 2008 at 3:27 pm |
very well said…..its a thought provoking poem that you have penned down.. keep up the good work…
28 02 2008 at 1:24 सकाळी |
very ni ce… and very true… but saasu dont behave like this many times… if she faced any problem than not to show it to her sun, she expects that “aamhala as zaal hote, hila pan kalal paahije” or ” khup sosal mi…. aata mi raani hote “
09 03 2008 at 11:47 pm |
very good
10 03 2008 at 12:26 सकाळी |
धन्यवाद, मंडळी !
22 03 2008 at 7:22 सकाळी |
आत्ताच तुमच्या blog वर click केलं.
अशिच पुर्वी एकदां हीच कविता मी वाचली होती.आणि मला ती फार आवडली होती.
आतां परत वाचल्यावर जूनी याद आली.
छान लिहीता तुमच्या हिंदी कविता पण छान आहेत.
श्रीकृष्ण सामंत